TOD Marathi

सध्या ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे. अशातच यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केलं आहे ज्याची चर्चा सुरु असून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. नेमकं प्रकरण काय आहे.

६ डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं, त्यामुळे तयार रहा अशा सूचना सर्व पोलिस स्टेशनला मिळाल्या आहेत. दुर्दैवाने मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे. ज्यांचा या लढ्याशी संबंध नाही, त्यांनी हा लढा ताब्यात घेऊन दंगली कशा वाढतील अशा प्रकारचं ते वक्तव्य करत आहत. असं विधान आंबेडकरांनी केलं होतं यावरचं नारायण राणेंनी त्यांच्यावर टिका केली आहे

राज्यात दंगली होतील, हे प्रकाश आंबेडकर यांना कसे माहीत? अशी विचारणा मंत्री नारायण राणे यांनी येथे केली. माहिती लपविणे गुन्हा आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. दंगल होणार तर पुरावा द्यावा लागतो. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक बोलत आहेत.त्यांनी आता घरी बसायला हवं, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.